Sunday, October 28, 2007

विसरु नकोस मला.......

पाणावलेल्या कडा म्हणतात,
विसरु नकोस मला,
ओठांवरच स्मित म्हणत,
आठवेलच मी तुला!!
सुकलेली पाने गळतात ना वारा सुटल्यावर,
तशी तुझी स्वप्न पडतात मी डोळे मिटल्यावर,
जे स्वप्न कदीही सत्य होनार नाही,
ते स्वप्न बघत आहे मी,
तु ज्या रस्त्या वरुन जात नाही,
त्या रस्त्यावर तुज़ी वाट बघत आहे मी,
जीवन आणी जीणे यातलेआता कळाले अंतर...
काही तु येण्यापूर्वी....काही तु गेल्या नंतर...!!!
जीर्ण झाल्या आठवणी साऱ्या,
पण नाळ मात्र अजूनही तुटत नाही,
अश्रूही झाले फितूर......
या डोळ्यांनाही आता पाझंर कसा फुटत नाही!!!
अपयशाला खचून जाउन,
यशाची माझी आशाच सुटत होती......
निरखून पाहिलं तेव्हा लक्षात आलं......
वादळात उन्मळून पडलेल्या वृक्षालाही नवी पालवी फुटत होती!!!

No comments: