कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये,
की आपल्याला त्याची सवय व्हावी,
तडकलेच जर ह्रुदय कधी,
जोडताना असह्य वेदना व्हावी,
डायरीत कुणाचे नाव इतकीही येऊ नये,
की पानांना ते नाव जड व्हावे,
एक दिवस अचानक त्या नावाचे,
डायरीत येणे बन्द व्हावे,
स्वप्नात कुणाला असेहि बघु नये,
की आधाराला त्याचे हात असावे,
तुटलेच जर स्वप्न अचानक,
तुटलेच जर स्वप्न अचानक,
हातात आपल्या काहिच नसावे,
कुणाला इतकाही वेळ देऊ नये,
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा,
एक दिवस आरशासमोर आपनास,
एक दिवस आरशासमोर आपनास,
आपलाच चेहरा परका व्हावा,
कुणाची इतकीही ओढ नसावी,
की पदोपदि आपण त्याची वाट बघावी,
आणि त्याची वात बघता बघता,
आणि त्याची वात बघता बघता,
आपलीच वाट दीशाहीन व्हावी,
कुणाचे इतकेही ऐकू नये,
की कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा,
की कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा,
आपल्या ओठांतुनही मग,
त्याच्याच शब्दांचा ऊच्चार व्हावा,
कुणाची अशीही सोबत असू नये,
की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी,
ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने,
डोळ्यात खळकन अश्रु जमावेत,
कुणाला इतकीही माझी म्हनू नये की,
त्याचे मीपण आपन विसरून जावे,
त्या संभ्रमात त्याने आपल्याला,
ठेच देऊन जागे करावे,
पण..........कुणाच्या इतक्याही दूर जाऊ नये,
की आपल्या सावलीशिवाय सोबत काही राहू नये!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
No comments:
Post a Comment