Saturday, November 10, 2007

कुणीतरी असावं.....


माझ्याच विचारांनी दिवस सुरू करणारं असावं,
काळजी घे स्वत:ची म्हणताना कळवळणारं असावं,
आई बाबांसोबत असताना फोन कट करणारं नसावं,
त्यांना कळणारही नाही इतक्या सहजतेने बोलणारं असावं,
दिवसभर माझ्या फोनची वाट पहाणारं असावं,
फोन का केला नाही म्हणून तक्रार करणारं असावं,
प्रत्येक दिवशी मला भेटण्याची ओढ असणारं असावं,
सुट्टीच्या दिवशी माझ्यासाठी वेळ काढणारं असावं,

बोलणं तिचं दिवसभराचा शीण घालवणारं असावं,
डोळ्यातला भाव समजणारं मन तिचं असावं,
एखाद्या भावनिक क्षणी डोळ्यात पाणी आणणारं असावं,
खरंच माझ्यावर जीवापाड प्रेम करणारं कुणीतरी असावं!!!

Saturday, November 3, 2007

मला हरवून टाकलेस तू.....

मला हरवून टाकलेस तू.....
काय सखे तु जादू केलीस,
मी माझ्यातच हरवून गेलो,
तुझ्या आसीम प्रेमाखातर,
माझं मलाच विसरून गेलो,
तुझे ते बंदिशातले केस,
आज अचानक वार्‍यासवे डोलू लागले,
जणु माझ्या भुललेल्या चेहर्‍यावर,
पिसार्‍यातले सारे मोरपिस गुदगुल्या करू लागले,
माझे ते छुपे इशारे अन,
तुझ्या त्या घाबरलेल्या नजरेचे तीर सारे,
माझ्या काळजाचा ठाव घेऊ लागले,
नकळत एवलूष्या जागेत तुझ्या प्रेमाचे बोन्साय वाढू लागले,
काय म्हणावा तुझा तो नखरा,
जणू बारमाही ठरलेला दिवाळी अन दसरा,
मी आपलं स्वत:ला त्यात गुंतवत गेलो,
आनंदाचे दिस कायमचे बस आपलेसे करत गेलो,
तु नाही दिसायची डोळ्यासमोरी माझ्या,
तेव्हा माझ्या पापण्याही जड व्हायच्या,
मान उंचावूनी मग त्या नयन बाहूल्या,
चराचरात तुला,रातनदिस शोधत रहायच्या,
तुझ्यासोबत मी अनुभवला तो श्रावण मंद सरींचा,
काय सांगू तुला मला कधी जाणवलच नाही,
असाही असतो पाऊस लहरीचा अन,
गोड गुलाबी मंद शिरशिरीचा,
कधी भांडलो तुझ्याशी उगाच,
अन कधी तरसवले मी तुला कारणांविनाच,
मग तुझी माफी मागताना साजने,
केला मी स्वत:ला एका पायवर उभा राहुनी अजब शिक्षेचा जाच,
बघ कसा हरवलो सखे मी तुझ्यात,
तुच सांग आता ही प्रेमाची कुठली जात???
का झालोय मी प्रेमवेडा अन,
सामावूनी गेलोय तुझ्या त्या अमर आत्म्यात........

कॉलेजला जाताना.....


कॉलेजला जाताना समोरच तिला बघितली,
मी दिसताच चालता चालता जरा थांबली,
माझ्याकडे बघुन गोड हसलीओठांची मोहोळ खुलली...
म्हटलं पोरगी बहुतेक पटली,
पण...हत तिच्या मारी,
मागे वळुन बघितल तर तिची मैत्रीण दिसली...

त्या दिवशी ती वर्गात आली,
येवुन नेमकी माझ्याच शेजारी बसली,
माझ्या अंगावर कशी शहारी पसरली,
बोलाण्यासाठी जीभ सरसावली...
पण...हत तिच्या मारी,
काही बोलणार इतक्यातच म्हणाली,
"प्लीज, पुढे बसशील ती पहा माझी मैत्रिण आली."

एकदा कॉलेजमधे परीक्षा सुरु झाली,
गाडी घेवुन जाताना रस्त्यातच मला भेटली,
पाठुनच तिनं एक हाक मारली,
उशिर झालेला म्हणुन लिफ्ट मागितली,
"थांब गाडी लावुन येतो!" म्हणुन गेट पाशी सोडली...
पण...हत तिच्या मारी,
गाडी लावे पर्यंत हीच टाटा करुन सटकली,

शेवटी मनाची तयारी केली,
शेवटचा पेपर संपल्यावर जाताना तिला गाठली,
हळुच खिशातली चिठ्ठी सरकवली,
गालावरची खळी पाहीली...वाटलं बहुतेक देवी पावली,
पण...हत तिच्या मारी,
म्हणाली "सॉरी, थोडक्यासाठी गाडी चुकली"!!!

Monday, October 29, 2007

"........आम्ही पुणेकर........."

"........आम्ही पुणेकर........."

आम्ही पुणेकर किनई ,
सोडत नाही बोलायचा chance....
वाटल्यास आम्ही बोलतो,
जे वाटेल ते in advance.....

खदाड खाऊ आम्ही,
पाणीपुरी वा pizza, फडशा पडतो....
बाकी खायच्या बाबतीत आम्ही,
सर्वांना minitaत मागे सारतो....

system विरुद्ध आम्ही,
तसे भर भरून बोलतो...
आणि वेळ येताच शेपूट,
आत घालून देखील पळतो...

अगदीच असे नाही हो,

कधी कधी आमच्यात
शिवाजी महाराजही संचरतो....
भले जयंती दोनदा साजरी करो....
पण साजरी तर करतो.....

आम्ही traffic rules
धाब्यावर देखील बसवतो.....
आणि वर मान करून,
मामाला 'मामा' बनवतो.....

galsच्या बाबतीतही आम्ही
अजिबात backward नाही....
ये नही और सही....
इथे कोणाला आहे घाई???

शनिवार वड्या बद्दल
आम्हाला खूप अभिमान आहे...
भले तिकडे फिरकत नसू,
पण कोणाची बोलायची टाप आहे?

तसे आमचे नेहमी असते,
बेफिकीर नि धम्माल जिणे...
कारण, पुणेकरच आम्ही,
इथे नसते कशाचेच उणे....

त्याचे काय आहे....

उणं कशातच असू नये,
आजवर हेच आलोय शिकत....
उगाच नाही पुण्याला,
शिक्षणाचे 'माहेरघर' म्हणत....

(आम्ही पुणेकरच हो..........)

मन तळ्यात मळ्यात......




मन तळ्यात मळ्यात,
जाईच्या कळ्यात,
मन नाजूकशी मोतीमाळ,
तुझ्या नाजूकशा गळ्यात.....

उरी चाहुलीचे मृगजळ,
वाजे पाचोळा उगी कशात,

इथे वा-याला सांगतो गाणी,
माझे राणी,
आणी झुळूक तुझ्या मनात.....

भिडू लागे रात अंगालागी,
तुझ्या नखाची कोर नभात,

माझ्या नयनी नक्षत्रतारा,
आणी चांद तुझ्या डोळ्यात,

मन नाजूकशी मोतीमाळ,
तुझ्या नाजूकशा गळ्यात,
मन तळ्यात मळ्यात,
जाईच्या कळ्यात........

आयुष्यातले प्रत्येक क्षण.....


आयुष्यातले प्रत्येक क्षण मोजत असता,

मला हळूच चाहूल लागून जाते,
एक सावली पडून जाते,
थंड वारं वाहवून जाते...

तेव्हापासून सारखी मी वाट पाहतो,
त्या सावलीची थंड वाय्राच्या झोक्याची,
नजरेसमोर येणाय्रा त्या व्यक्तिच्या प्रतिबिंबाची...

तेव्हा पासून,
मन माझे मला सांगत असते,
वाट पाहायची,
वाट पाहयची,

कधीतरी ती व्यक्ति समोर येते,
मनाला आनंदाचा अस्वाद देते,
तिच्या फक्त गोड शब्दांमधून,
अनेक गोडवे जाणवतात...

तेव्हा माझे मन स्वत: ठरवते,
सर्व काही मिळवीन,
सर्वकाही सोसीन,
आयुष्यातला प्रत्येक क्षण देईन...

आयुष्यातील सर्व दु:ख,
गोळीसारखी एकाच वेळी गिळून टाकीन,
डोळ्यातले अश्रु न थांबल्यास तुझे चित्र पाहीन,
अन डोळे मिटिन...

मला असेच वाटते.....
आयुष्य जगावे,
सर्व काही संपवावे.....
प्रत्येक क्षण सोनेरी बनवावा

हे ह्र्दय काढून द्यावे
फक्त तुझ्याच साठी

कसे सरतील सये, माझ्यावीना दिस तुझे???






कसे सरतील सये, माझ्यावीना दिस तुझे
सरताना आणि सांग सलतील ना?
गुलाबाचे फुल दोन्, रोज रात्री डोळ्यावर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना?

पावसाच्या धारा धारा, मोजताना दिस सारा
रितेरिते मन तुझे उरे, ओठभर हसे हसे
उरातून वेडेपिसे, खोल खोल कोण आंत झुरे
आता जरा अळीमिळी, तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखावून हसशील ना?

गुलाबाचे फुल दोन्, रोज रात्री डोळ्यावर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना?


कोण तुझ्या सौधातून्, उभे असे सामसूम
चिडीचूप सुनसान दिवा, आता सांज ढळेलच
आणि पुन्हा छळेलच, नभातून गोरा चांदवा
चांदण्यांचे कोटी कण, आठवांचे ओले सण
रोज रोज नीजभर भरतील ना?

गुलाबाचे फुल दोन्, रोज रात्री डोळ्यावर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना?


इथे दूर देशी, माझ्या सुन्या खिडकीच्यापाशी
झडे सर कांचभर तडा, तुच तुच तुझ्या तुझ्या
तुझी तुझी तुझे तुझे, सारा सारा तुझा तुझा सडा
पडे माझ्या वाटेतून, आणि मग काट्यातून
जातांनाही पायभर मखमल ना?

गुलाबाचे फुल दोन्, रोज रात्री डोळ्यावर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना?


आता नाही बोलायाचे, जरा जरा जगायाचे
माळूनीया अबोलीची फुले, देहभर हलू देत
वीजेवर डुलू देत, तुझ्या माझ्या विरहाचे झुले
जरा घन झुरू दे ना, वारा गुदमरू दे ना
तेंव्हा मग धरासारी भिजवेल ना?

गुलाबाचे फुल दोन्,रोज रात्री डोळ्यावर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना?
??

Sunday, October 28, 2007

प्रेमाचा खरा अर्थ..........

दूरवरच्या माळावरमला एक वड दिसला होता,
माझ्याप्रमाणेच तोही मला एकटा वाटला,
मी त्याला विचारलं,
तुझ्याही मनात तेच चाललयं का जे माझ्या मनात,
तर म्हनाला,
मी तर पडलोय प्रेमात,
तुझं मला काय माहीत?
मी पुन्हा विचारलं प्रेम म्हनजे काय असतं,
तर म्हनाला,
प्रेम हे जगन्याचं भान असतं,
पावसानंतर हिरवं झालेलं रान असतं,
बर्फ़ाळ थंडीत गारठून गेलेलं पान असतं,
वैशाखवणव्यात पानगळ झालेलं झाड असतं,
अलगद झोळीत पडलेलं दान असतं,
मी त्याला विचारलं तू कुणाच्या प्रेमात पडलायस,
तर म्हणाला,
मी त्या मेघाच्या प्रेमात पडलोय,
जिने मला गेल्या पावसात भिजवलं,
मी त्याला म्हणालो,
अरे मी तीला ओळखतो,
सगळेच ओळ्खतात,
ती तर सगळ्यानांच भिजवतेपण,
पण म्हणून तू तिच्या प्रेमात पडलायसं,
अरे मग तर तू मुर्खच,
अरे तू स्वताकडे पाहिलयस का?
अर्धा तर जमिनीत रुतलेला,
उंच होण्याऐवजी नुसताच जाडीने वाढ़णारा,
त्या आकाशीच्या मेघांची अपेक्षा करतोयस,
तर तो नुसताच गूढ़् हसला,
इत्क्यात अंधारुन आले,
आकाशात मेघच मेघ जमा झालेतो हर्षभरीत नजरेनं वर बघत् होता,
पण ती मात्र वा-याशी गप्पा मारत होती,
त्याच्याशी खेळत होती,
या वडाबद्द्ल तर तीला काहीच माहीत नव्हते,
मी खिन्न मनानेपरत निघालो,
थोडा दूर गेलो असेल तोच,
काडकन आवाज झाला,
प्रकाशाचा लोळ उठला मेघातून निघालेली वीज,
धाडकन वडावर कोसळलीमी त्याच्याकडे पाहिले,
मरणाच्या दारात असुनहीतो हसत होता,
मला म्हनाला,
अरे मी तिच्यासोबत घालवलेला,
हा क्षण मला पुरेसा आहे,
मी समाधानाने प्राण सोडतो आहे,
मी मात्र सुन्न झालो होतो,
प्रेमाचा खरा अर्थ आता मला कळला होता...............

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये.........



कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये,
की आपल्याला त्याची सवय व्हावी,
तडकलेच जर ह्रुदय कधी,
जोडताना असह्य वेदना व्हावी,

डायरीत कुणाचे नाव इतकीही येऊ नये,
की पानांना ते नाव जड व्हावे,
एक दिवस अचानक त्या नावाचे,
डायरीत येणे बन्द व्हावे,

स्वप्नात कुणाला असेहि बघु नये,
की आधाराला त्याचे हात असावे,
तुटलेच जर स्वप्न अचानक,
हातात आपल्या काहिच नसावे,

कुणाला इतकाही वेळ देऊ नये,
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा,
एक दिवस आरशासमोर आपनास,
आपलाच चेहरा परका व्हावा,

कुणाची इतकीही ओढ नसावी,
की पदोपदि आपण त्याची वाट बघावी,
आणि त्याची वात बघता बघता,
आपलीच वाट दीशाहीन व्हावी,

कुणाचे इतकेही ऐकू नये,
की कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा,
आपल्या ओठांतुनही मग,
त्याच्याच शब्दांचा ऊच्चार व्हावा,
कुणाची अशीही सोबत असू नये,
की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी,
ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने,
डोळ्यात खळकन अश्रु जमावेत,

कुणाला इतकीही माझी म्हनू नये की,
त्याचे मीपण आपन विसरून जावे,
त्या संभ्रमात त्याने आपल्याला,
ठेच देऊन जागे करावे,

पण..........कुणाच्या इतक्याही दूर जाऊ नये,
की आपल्या सावलीशिवाय सोबत काही राहू नये!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

विसरु नकोस मला.......

पाणावलेल्या कडा म्हणतात,
विसरु नकोस मला,
ओठांवरच स्मित म्हणत,
आठवेलच मी तुला!!
सुकलेली पाने गळतात ना वारा सुटल्यावर,
तशी तुझी स्वप्न पडतात मी डोळे मिटल्यावर,
जे स्वप्न कदीही सत्य होनार नाही,
ते स्वप्न बघत आहे मी,
तु ज्या रस्त्या वरुन जात नाही,
त्या रस्त्यावर तुज़ी वाट बघत आहे मी,
जीवन आणी जीणे यातलेआता कळाले अंतर...
काही तु येण्यापूर्वी....काही तु गेल्या नंतर...!!!
जीर्ण झाल्या आठवणी साऱ्या,
पण नाळ मात्र अजूनही तुटत नाही,
अश्रूही झाले फितूर......
या डोळ्यांनाही आता पाझंर कसा फुटत नाही!!!
अपयशाला खचून जाउन,
यशाची माझी आशाच सुटत होती......
निरखून पाहिलं तेव्हा लक्षात आलं......
वादळात उन्मळून पडलेल्या वृक्षालाही नवी पालवी फुटत होती!!!

चॉकलेट पेक्षा गोड असेल.......!!!

ही कविता वाचताना तुझ्या मनात मझ्याबद्दल ओढ़ असेल.....

नक्कीच ही कविता चॉकलेट पेक्षा गोड असेल.......


मनातल्या मनात वाह म्हणून दाद देशिल......
सांग न माला..........खरंच का कधीतरी माझी होशील.....

ठाउक आहे मला काय चाललय तुझ्या मनात.......
फक्त एकदाच मन घटट करून.......सांगशील का गं माझ्या कानात.......
वाट पाहिन तुझ्या उत्तराची........खात्री आहे मला तुझा होकार असेल.......
नक्कीच तो दिवस चॉकलेट पेक्षा गोड असेल.......
आज भेटली ती मला......न मागताच चॉकलेट दिला मी तिला.....
हसत हसत म्हणाली का रे असा वागतोस........

मीच तुझ्याकडे मागते रोज.....तू का नाही माझ्याकडे चॉकलेट मागतोस......
नाही कळत मला चॉकलेटची गोडी......तुझ्यावीना कशी व्ह्ल्लवू संसाराची होडी......

जेंव्हा तुझ्या मनात माझ्या होडीत बसण्याची.......ओढ़ असेल......
नक्कीच तो दिवस चॉकलेट पेक्षा गोड असेल.......

रागाऊ नकोस माझ्यावर कधी...........तुझ्या बरोबर फिरायला.......
तू सांगशील तिथे येत जाईंन....मी तुला रोज एक चॉकलेट देत जाईन.......

कधी देशील तुझा होकार मला......याची मी वाट पाहत राहीन.....
तुझ्या तोंडून कधी कडू शब्द येणार नाही म्हणुन मी तुला रोज एक चॉकलेट देत जाईन.......

काय होईल पुढे, केंव्हा कधी कसे....याचीच वाट मी पाहत राहीन.......
मी तुला रोज एक चॉकलेट देत जाईन.......

अशी तु माझी सावली...

मखमली स्पर्श तुझे,
मायेची तु माऊली,
रखरखीत उनाड या जिवनी,
अशी तु माझी सावली...
सुखासुखी बरसूनी,
देहावरुनी अलगद ओघळली,
अल्हाद स्पर्शिल्या या अनुभवाची,
अशी तु माझी सावली...
सायंकाळी मावळतीचे रंग सोनेरी,
मी उभा त्या तळ्याकाठच्या मंदिरी,
तुझ्या आठवणीला तु उभी सामोरी,
अशी तु माझी सावली...
आनंदात माझ्या रंग तुझे,
दुखा:त माझ्य संग तुझे,
आयुष्याची अशी कायमची दोरी,
अशी तु माझी सावली...
चालतो मी जिंदगीची वाट,
तु आयुष्याच्या पुर्णत्वाची पहाट,
माझ्या किनार्‍याला धडकते तुझीच ती लाट,
अशी तु ऐकमेव माझी सावली...
सांगायच आहे तुला बरचं,
माझं हे सारं काही तुझचं,
बस अशीच माझ्या सर्वस्वात रहा,
एकदातरी या सावलीतून,
माझ्या समोर येऊन उभी रहा........

हे प्रेम आहे की मैत्री........




हे प्रेम आहे की मैत्री.....
तुला काय वाटते........

तुझ्याशी खुप खुप बोलावेसे वाटते...........
पण शब्द चुकण्याची भीती वाटते............

तुझ्या खुप खुप जवळ यावेसे वाटते.........
पण विरहाची भीती वाटते.....................

तुझ्या सोबत चालावेसे वाटते.................
पण रस्ता चुकण्याची भीती वाटते............

तुझ्या नजरेला नजर द्यावीशी वाटते.........
पण पापण्या मिटण्याची वाटते...............

तुला बाहुपाशात घ्यावेसे वाटते...............
पण मिठी चुकण्याची वाटते...................

तुझ्या सोबत आयुष्यभर जगावेसे वाटते.....
पण तुझ्या आई-बाबाची भीती वाटते.........

आता तुच सांग सखी...........................
हे प्रेम आहे की मॆत्री............... तुला काय वाटते.......................

मीच असेल.......

आठवण माझी कधीतरी येईलच तुला,
तु कदाचीत रडशीलही,
हात तुझे जुळवुन ठेव तु,
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील,
जो थांबला तुझ्या हातावर,
नीट बघ त्याच्याकडे,
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल.....
माझ्या आठवणी एखदयाला सांगताना,
तु कदाचीत हसशीलही,
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता,
नीट वापर त्याला,
अडखळलेला तो शब्द मीच असेल.....
कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला,
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील,
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं,
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल.....
कधी जर सुटला बेधुंद गार वारा,
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील,
मध्येच स्पर्शली तुला जर उबदार प्रेमळ झुळुक,
नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल......

अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.......



तिला म्हणालो,मला आजकाल झोप येत नाही,काय करु,
तुझी आठवण मला झोपूच देत नाही,
क्षणभर विलम्ब न करता तिने तिची पर्स उघडली,
झोपेची गोळी काढून,माझ्या हातावरती दिली.......
काय सांगू तुम्हाला,माझी वेगळीच केस आहे,
अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.

मी म्हणालो, माझ्या प्रत्येक श्वासात तुझाच गंध आहे,
रक्ताच्या प्रत्येक थेंबास, तुझ्या प्रेमाचा रंग आहे,ती म्हणाली,
धीर धर अजुन थोडासाच उशीर आहे,
उद्या आमच्या रुग्णालयात मोफ़त रक्ततपासणी शिबीर आहे.......
काय सांगू तुम्हाला,माझी वेगळीच केस आहे,
अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.

मी म्हणालो, तुझ्यासाठी काहीही करु शकतो,
माझ ह्रुदय काढून, तुझ्या हाती धरु शकतो,
त्याक्षणी ती उठली,आणि आत निघून गेली,
माघारी येताना हाती"डिसेक्शन बॉक्स"घेवून आली........
मित्रांनो अशी ही, माझी वेगळीच केस आहे,
अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.

एकदा तिच्याशी बोलता बोलता ठेच मला लागली,
तिने तिची ओढणी,माझ्या पायावरती बांधली,
नजरेस नजर मिळवून माझ्या,हळूच ती म्हणाली,
पडलास तू,पण जखम माझ्या काळजावरती झाली........
तर माझी ही केस अशी आहे,
एक एम.बी.बी.एस. माझी प्रेयसी आहे!!!!!

आठवणीने दे......

चांदणे पांघरलेले आकाश नाही मागत तुझ्याकडे,
क्षितिजावर लुकलुकणारा एक तारा मात्र आठवणीने दे...
बेभान कोसळणारा मुक्त पाउस नाही मागत तुझ्याकडे,
श्वासात दरवळणारा ओल्या मातीचा सुवास मात्र आठवणीने दे...
बेधुंद करणा-या रातराणीचा बहर नाही मागत तुझ्याकडे,
जाताना एक मोग-याची कळी मात्र आठवणीने दे...
उसळणारा बेछुट दर्या नाही मागत तुझ्याकडे,
शांत जलाशयातील एक तरंग मात्र आठवणीने दे...
मुठी एवढे ह्रुदय नाही मागत तुझ्याकडे
माझ्यासाठी चुकलेला एक ठोका मात्र आठवणीने दे.....

मैत्रीचं अतुट नाते हे अपुलं.........



मैत्रीचं अतुट नाते हे अपुलं,
दोघांनीही सहज जपलं,

कधी रडू तर कधी हसू,
हास्यासहीत हे पुसले आसू,

रोज माझा तुला, किंवा तुझा मला,
एक तरी एसएमस नक्कीच आला,

येणारा एसएमस हा तुझाच असतो,
चुकून कधी तरी दुसऱ्याचा असतो,

मैत्री ही अपुली थोडी खास,
इतरांना कदाचीत होतो त्रास,

खरं सागुं, मला तुझ्या मैत्रीचा लळा लागलायं,
मैत्री मैत्री म्हणता, तुझ्यात माझा जीव गुंतलाय,

सकाळी उठलो तरी तुझाच चेहरा,
रात्री झोपलो तरी तुझाच चेहरा,

वाटलं नव्हतं तुझ्या भोवती इतका गुंतेण,
रेशमाच्या किड्याचा तंतू बनून,

कळंत नाही मनाला गं माझ्या,
का लागली आस संगतीची तुझ्या,

ठाऊक आहेत बंधनं तुझी नी माझी,
तरी सुद्धा लळा लागला हा जीवा,

खरंच होतो त्रास, पाहुन तुझं ते हास्य,
जेव्हा कळतं नशिबी नाही माझ्या हे हास्य,

आता मात्र ठरवलयं, का करुन घ्यायचा त्रास,
नाही गोष्ट नशिबी मग उगाचच का ठेवू आसं,

आता फक्त एकच नातं, अपुल्या गोड मैत्रीचं,
शिकलो एक गोष्ट मात्र,

करेन गोड मैत्री फक्त, नाही लाऊन घेणार लळा,
कारण, लागला जर लळा तर, सहन होत नाहीत गं या कळा!!!

होशील का???

मार्ग माझे खुंटलेले,
दिशा तु होशील का?
स्पर्श माझे वाळलेले,
चेतना तु होशील का?
डॊळे माझे भरुनी आले,
फक्त अश्रु तु होशील का?
ह्रिदय माझे थांबलेले,
स्पंदने तु तयाची होशील का?
बिंब माझे विस्कटलेले,
प्रतिबिंब तु माझे होशील का?
सुर माझे हरवलेले,
जिवन गाणे माझे तु गाशील का?
एकटाच आहे मी,
मज साथ तु देशील का?
गुलाब माझा सुकलेला,
तरिही सुंगध तु त्याच होशील का?
सांग प्रिये सांग तु होशील का,
ह्या वेड्याजिवाला आपलसं करशील का?
आता खरोखरी शब्द माझे संपलेले,
म्हणूनी माझी कविता तरी तु होशील का?

Thursday, October 25, 2007

गालावरी खळी..............डोळ्यात धुंदी!!!!!






गालावरी खळी डोळ्यात धुंदी,
ओठावर खुले लाली गुलाबाची,
कधी कुठे कसा तुला सांग भेटू,
वाट पाहतो एका ईशा-याची,
जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू,
माझा रंग तू घे, तूझा रंग मला दे,

कोणताहा मौसम मस्त रंगाचा,
तुझ्यासवे माझ्या जिवनी आला,
सुने सुने होते किती मन माझे,
आज तेच वाटे धूंद मधुशाला,
जगण्याची मज आता कळते मजा,
नाहि मी कोणाचा आहे तुझा,
सांगतो मी खरे खुरे तुझ्यासाठी जीव झुरे मन माझे थरारे,
कधी तूझ्या पुढे-पुढे कधी तुझ्या मागे-मागे करतो मी ईशारे,
ए जाऊ नको दूर तू,
जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू,
माझा रंग तू घे, तूझा रंग मला दे,

तुझ्या पापण्यांच्य़ा सावलीखाली,
मला जिंदगीही घेऊनी आली,
तुझ्या चाहुलीची धुन आनंदि,
अंतरास माझ्या छेडूनी गेली,
जगण्याची मज आता येई मजा,
तू माझे जिवन तू माझी दिशा,
आता तरी माझ्यावरी कर तुझी जादूगीरी हुर-हुर का जिवाला,
बोल आता तरी काहि तरी भेट आता कुठे तरी कसला हा अबोला,
ए जाऊ नको दूर तू,
जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू,
माझा रंग तू घे, तूझा रंग मला दे!!!

तर ते आहे प्रेम....!

हे प्रेम आहे,
तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्हाला ती आवडते,
तर हे प्रेम नाही हा तर मोह.....!

तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण,
तुम्ही तिच्या स्पर्शाशिवाय राहू शकत नाही,
तर हे प्रेम नाही ही तर वासना.....!

तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण,
तुम्ही तिला सोडू शकत नाही असा विचार करून की तिच्या भावना दुखावतील,
तर हे प्रेम नाही ही तर तडजोड.....!

तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण,
तुम्ही तुम्ही तिच्यापासून काही लपवत नाही तिला सर्व काही सांगतात,
तुमचे सर्व अनुभव वाटतात,
तर हे प्रेम नाही ही तर मैत्री.....!

जर तुम्हाला तिच्या यातना कळतात,
तिने न सांगत...आणि त्याचा त्रास तुम्हाला होतो...,
तर ते आहे प्रेम.....!

जर तुमच्याकडे दुसरे आकर्षित होतात,
तरीही तुम्ही तिच्यासोबत राहता....,
तर ते आहे प्रेम....!

जरी तुम्हाला तिचा स्वभाव आवडत नाही,
आणि तुम्ही त्याला बदलनण्याचा विचारही करत नाही,
तिला जसेच्या तसे स्विकारता....,
तर ते आहे प्रेम......!

जर तुम्ही तुमच्या सर्व भावना तिला देता,
पण तिच्याकडून त्याची अपेक्षा करत नाही,
आणि वाट पहाता की ती कधी ना कधी तिच्या सर्व भावना स्वत:हून सांगेल....
तर ते आहे प्रेम.....!

मी कोण आहे बरं???




मी कोण आहे बरं???
मी शोधतोय स्वतःहाला माझ्या प्रवासात...

कधी वाटते मीच हरवलोय कुठे तरी,
आज इथे अन् उद्या तिथे शोधतोय काही तरी...
मागासलेला असलो तरी मागासलेला नाही,
आणि आपल्या माणसांचा असलो तरी आपल्या माणसात् नाही...

बरीच प्रश्न मनाला भेडसावत असतात,
हलक्या पावलांनी आलेली स्वप्ने खुणावत असतात...
प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता हल्ली मीच कोड्यात पडतो,
राहुदे गड्या म्हणुन मग मीच स्वतःहाची समजुत काढतो...

काय हरवलय विचार करता करता मीच हरवुन बसतो,
आणी जुन्या आठवणींची एक छानशी सवारी करुन येतो...
आठवणींच्या कप्यात अजुनही शाळेची पाटी कोरी आहे,
अन त्याच बाकावर मित्रांबरोबर बसण्याची ईछा मात्र मनी आहे...

मला एकदा माझ्या शाळेतली सकाळची घंन्टा ऐकायची आहे,
शाळेत जातानाची मनाची हुरहुर अनुभवायची आहे...
तोच जुन्या मित्राचा सहवास हवाय मला,
शाळेचा एक आभास हवाय मला...

आता या प्रश्नांची उत्तरे शोधावी...की असेच पुढे जावे...
कडु गोड आठवणींसोबत हसावे के रडावे???

एकदा काय झालं.........

एकदा काय झालं,
एक सरिता रागवली,
आपल्या boyfriend ला म्हणाली,

हे रे काय सागर!
मीच का म्हणून?

दर वेळी मीच का,
मीच का यायचं खाली डोंगरावरून?
आणायचं रानावनातलं सारं तुझ्यासाठी,
दरी बघायची नाही,
कडा बघायचा नाही,
कशी सुसाट पळत येते मी,
विरहव्याकुळ, संगमोत्सुक,
कधी एकदा तुला गच्च मिठी मारीन,
तुझ्यात हरवून,हरपून जाईन,

आणि तू वेडा,
तुझं लक्षच नसतं कधी,
सारखा त्या चंद्रिकेकडे टक लावून असतोस,
उसळतोस तिच्यासाठी,
तुझ्यासाठी पाणी आणते मी,
पण तुला भरती येते तिच्यासाठी,

मी नाही जा!
बोलणारच नाही आता,
येणारही नाही,
काठावरच्या लोकांना सांगून,
मोट्ठं धरण बांधीन,
थांबून राहीन तिथेच,
बघच मग,

सरिताच ती,
बोलल्याप्रमाणे वागली,
सागर बिचारा तडफ़डला,
आकसला, आतल्या आत झुरत गेला,
शेवटी फ़ुट्ला बांध त्याच्याही संयमाचा,
उठला ताड,
ओरडला दहाड,
उफ़ाळला वारा पिऊन,
लाटांचं तांड्व घेऊन,
सुटला सुसाट,
सरितेच्या दिशेने,

लोक येडे,म्हणाले........
' सुनामी आली !! सुनामी आली !!'

प्रतिबिंबाला पाहून..........



प्रतिबिंबाला पाहून,
हे जग फसते आहे,
आपले आपले म्हणत,
भासांच्यामागे पळते आहे.....

रडत बसू नकोस तु,
लढण्यास तयार हो तु,
फक्त एकदा मनाशी ठरव,
आणि मग बघ,
ही जमीन तुझीच आहे,
आणि हे आकाशही तुझेच आहे...

असे किती वेळ चालायचे,
आम्ही विचा-यांच्या हिदोंळ्यावर झुलायचे,
खाली पडून पुन्हा उभे रहायचे,
आणि पुन्हा रोज नव्याने जगायचे...

आतापर्यंत हेच म्हणालो की,
आता झालं - गेलं जाउ देत...
पण आता मी तसं म्हणणार नाही,
कारण त्याने आता काहीच साध्य होणार नाही....

मनातले भाव ओठांवर नाही आले,
म्हणून लेखणीवाटे कवितेत उतरवले,
पण सर्व व्यर्थ गेले,
कारण त्यातले भाव तुला कधी ना उमगले....

आयुष्याच्या वाटेवर,
मी आता मागे वळून पहात नाही,
कारण मागे वळून पहाण्यासारखे,
खरंच काही उरले नाही......

उणीव कसची भासली..............

फ़ुललेला आसमंत तरी,
उणीव कसची भासली,
आतुरलेल्या मनाची,
हि ओढ कसली,

शुभेच्छांच्या वर्षाव,
तरी कुठल्या शब्दांची आस,
हलकासा गालावर आलेला,
मोहकसा श्वास,

चादण्यांची आरास,
मांडली त्यांच्यासाठी,
कोणत्या चांदराती,
जुळतील जन्मगाठी,

शब्दाविन बोलतील,
जेव्हा त्यांचे डोळे,
कवितेचे माझ्या,
शब्द शब्द ओले ओले,

वाट बघते आहे,
त्या अनमोल क्षणाची,
फ़ुलायला अधीर् झालेली,
कोमल कळी प्राजक्ताची...........

पहिली भेट, पहिल्या परिक्षेसारखी!


पहिली भेट, पहिल्या परिक्षेसारखी!
उत्तराची वाट पाहणा-या अगतिक प्रश्नासारखी...

पहिल्या भेटीत..
एकमेकांची नजर चुकवून
एकमेकांना पहायचं असतं,
स्वत: मात्र साळसूदपणे
चेहे-याआड लपायचं असतं!

पहिल्या भेटीत..
अगदी सावधपणे वागायचं असतं,
हसतानाही चेहे-यावरचं
खोटं गांभीर्य जपायचं असतं!

पहिल्या भेटीत..
एकमेकांना समजायचं असतं,
निदान जे समजलं नाही
तेच कळलंय असं दाखवायचं असतं!

पहिल्या भेटीत..
अनेक शंकांचं ओझं वहायचं असतं,
'त्याच्या' सोबत आपणही स्वत:ला
अपेक्षांच्या तराजूत तोलायचं असतं!

पहिल्या भेटीत..
मनातून खूप काही बोलायचं असतं,
नेमकं अशाच वेळी ओठांनी
जिभेवरल्या शब्दांना आवरायच असतं!

पहिल्या भेटीत..
सतत घड्याळ निरखायचं असतं,
एकमेकांच्या काट्यांमध्ये
इतक्या लवकर गुंतायचं नसतं!

पहिल्या भेटीत..
त्याने "काय घेणार?" विचारायचं असतं,
मग ती मेनू कार्ड पाहताना त्यानं
हळूच खिशातलं वॉलेट चाचपायचं असतं!

पहिल्या भेटीत..
'ती' जे काही मागवेल,
ते 'त्यानं' मुकाट्यानं खायचं असतं
नाही आवडलं तरी,"किती छान डीश आहे!"
असं आवंढा गिळून म्हणायच असतं!!!!!

या जगात सर्वात सुंदर काय........

या जगात सर्वात सुंदर काय अस विचारलं तर,
मी म्हणेन, माणसाचं माणसासोबत असलेल नातं...

अस नातं गुंफ़ता गुंफ़ता,
स्वत:सोबत स्वत:चेच एक नाते,
नकळतं गुंफ़ले जात असते...

कितीतरी खोल द-या, उंचच सुळक्यांचे डोंगर,
अन काटेरी झुडपांचे रस्ते पार करतांना,
नात्याला धक्का न लागू देण्याची ती असोशी....

जगण्याचे सगळे संदर्भ त्या नात्यात एकवटून यावेत,
अन जगता जगता ते नातंच एकाएकी गवसेनासं व्हावं...

रिकाम्या ओंजळीनेच मग,
जगण्याचे सगळे धडे भरभरुन द्यावे...

असं नातं जसं समृध्द करतं.... तसच वाताहातही करतं...

तरीही,
या जगात सर्वात सुंदर काय अस विचारलं तर,
मी म्हणेन, माणसाचं माणसासोबत असलेल नातं......

प्रेम करणं सोपं नसतं...........

प्रेम करणं सोपं नसतं,
सर्व करतात, म्हणून करायच नसतं,
चित्रपटात बघीतलं, म्हणून करायच नसतं,
पुस्तकात वाचलं , म्हणून करायच नसतं,
तर कुणाकडून ऐकलं, म्हणून करायच नसतं,
कारण प्रेम करणं सोपं नसतं,
शाळा कॉलेजांत असच घडतं,
एकमेकांना बघीतलं की मन प्रेमात पडतं,
अभ्यासाच्या पुस्तकात मग तिचच रुप दिसतं,
जागेपणी ही मग प्रेमाचं स्वप्नं पडतं,
ज्या वयात शिकायचं असतं त्यावेळी भलतचं घडतं,
करीयरचं सत्यानाश तर आयुष्याचं वाटोळं होतं,
सहाजीकचं मग आईवडीलांच्या ईच्छांवर पाणी पडतं,
कारण प्रेम करणं सोपं नसतं,
हॉटेल सिनेमागृहात नेहमी जावं लागतं,
पैशाचं बजेंट नेहमी बनवावं लागतं,
फोन कडे नेहमी लक्श ठेवावं लागतं,
मग जागेपणीही स्वप्न दिसायला लागतं,
डोक्याला ताप होऊन डोक दुखायला लागतं,
आनंद कमी दुःख जास्त भोगावं लागतं,
एवढ सगळं करणं खुप कठीण असतं,
कारण प्रेम करणं सोपं नसतं............

तिला मी शोधतो आहे........

जिच्या गालाच्या खळीवर चंद्राचे चांदणे उमलेल तिला मी शोधतो आहे.
बाईकवर बिलगून बसेल, मित्रांसमोर मी मिरवेन तिला मी शोधतो आहे.

माझ्या विनोदाला हसेल, वा काय विनोद! म्हणेल तिला मी शोधतो आहे.
आज मॅच आहे म्हणताच, भेटलो नाही तरी चालेल म्हणणारीला शोधतो आहे.

सारखं सारखं लाडात येऊन शॉपिंगला चल म्हणणार नाही, तिला मी शोधतो आहे.
माझ्या डोळ्यातल्या स्वप्नांना, ही माझीच तर स्वप्ने म्हणेल तिला मी शोधतो आहे.

मला आवडणारी असेलच पण आईला सुध्दा आवडेल तिला मी शोधतो आहे..........

उशीर होतोय का??

ती माझ्याकडे बघते,
मी तिच्याकडे बघतो,
पण बोलणे होतच नाहि,
बोलायला उशीर होतोय का?

काल सुद्धा तिने खूप वेळा पाहिले,
माझेच लक्षच नव्हते,
म्हणून मला नाहि कळले,
बघायला सुद्धा आता उशीर होतोय का?

माझी नजर गर्दीतून तिलाच शोधत असते,
तिची नजर देखिल कोप-यात वाट पहात असते,
नजर मिळाल्यानंतर ती गोड हसते,
मला हसायला उशीर होतोय का?

ती का बोलायला येत नाहि,
याचा विचार मी करतो,
आणि समोर आली कि,
मला सगळ्याचाच विसर पडतो,
माझ्या विचारण्याला उशीर होतोय का?

दिवसामागून दिवस जात आहेत,
आमचे नुसते असेच चालू आहे,
कधी कोणी तरि पुढे येणार का,
अजून होणारा उशीर थांबवणार का?

आता सुद्धा मला उशीर होतोय,
इतके दिवस तिला पहातोय,
तिच्या सौंदर्याला शब्दात ऊतरवायला,
उशीर होतोय का?
सांगा,उशीर होतोय का??????

ओलावा प्रेमाचा

मन चिंब ओले,
ओल्या पावसात न्हाले,
सये तुझ्या आठवणींच्या,
मृदगंधात बेधुंद जाहले.....

ओल्या त्या दिसांच्या,
ओल्याच त्या आठवणी,
धुंद - बेधुंद मनाची,
ती बेताल बेसूर गाणी.....

भिजताना त्या पावसात,
हरवलो तुझ्याच मिठीत,
तो प्रत्येक क्षण ओला,
साठवत होतो मनात.....

कोरड्या या आयुष्यात,
वाहून तू अशी गेली,
जणू ओल्या त्या पावसाची,
सर एक बरसून गेली.....

ओल्याच त्या ऋतूतले,
असे आपले प्रेम ओले,
ओल्याच त्या प्रेमात,
मन चिंब चिंब भिजलेले.....

त्या जपलेल्या आठवणींचा,
गंध, कस्तुरी भासे मजला,
त्या बासणात गुंडाळलेला,
प्रत्येक क्षण, अजूनही चिंब भिजलेला.....

अजूनही चिंब भिजलेला,
आपल्या ओल्या प्रेमाला,
तो क्षण, आतुरलेला,
प्राजक्ताच्या थेंबातून ओघळलेला.....

ती आहे... ...अळवावरचे पाणी.......



ती आहे.....अळवावरचे पाणी...
जे हाती कधी लागत नाही...
आहे एक मृगजळ...
ज्याने तृष्णा कधी भागत नाही...

ती आहे.....एक स्वप्न...
जे कधी सत्यात येणार नाही...
आशेचं वेडं पाखरू...
जे फिरुन घरट्यात येणार नाही...

फुलाहून नाजूक ती...
जणू चंद्राची चांद्णी आहे...
ती अस्मानीची परी...
माझ्या हृदयाची राणी आहे...

कवितेतून भेटते ती मला...
तिचे गोजिरे रूप घेऊन...
माझ्या मनातून संगीत वाहते...
शब्दांचे सुंदर साज लेऊन...

धुक्यात हरवत्या वाटेवरती...
मला ही धुंदीत राहायचे आहे...
माझ्या प्रेमाचे प्रतिबिंब...
तिच्या डोळ्यात पाहायचे आहे...

तिने यावे...
चंद्र ता-यांचे पैंजण पायी लेऊन...
भ्रमराला ही धुंद करणाया...
फुलांचे सुगंध घेऊन...

ती येताच.. काळाचे धावते पाऊल...
अचानक थांबावे...
ते एक क्षणाचे स्वप्न...
मी अनेक युगे जगावे...

प्रेमाची ही पाऊलवाट...
या मुशाफिराला नवी आहे...
आयुष्याच्या या वळणावर...
तिचीच साथ मला हवी आहे..

फक्त........तिची साथ मला हवी आहे.........

बघ.. ....माझी आठवण येते का..?

( कवी सौमित्र यांची क्षमा मागून..)

माझ्या विनंतीचा करुन धिक्कार..
कुणा भाग्यवंताचा करशील तू स्वीकार..
त्याच्या सोबतच्या एखाद्या धुंद क्षणाने..
एकांतातल्या तुझ्या झुरण्याने...
माझी आठवण पुसून निघते का?
सखे.. कितीही पुसायचा प्रयत्न केला तरी...
बघ.. माझी आठवण येते का..?

त्याच्या मुखावरच्या स्मिताने.. तुझी पहाट खुलत राहील..
तुझ्या डोळ्याच्या आतुरतेत.. तो आपले प्रेमच पाहील..
राजा-राणीचा हा संसार.. असाच पुढे बहरत जाईल..
सुखाच्या वर्षावात चिंब भिजूनही..
तुझे मन कोरडे राहते का?
अशाच एका कातर वेळी..
बघ.. माझी आठवण येते का..?

वार्धक्याच्या पाऊलखुणांनी.. जेव्हा तू थकून जाशील..
पतीच्या थरथरत्या हाताला धरुन.. स्वतःला सावरु पाहशील..
त्याची साथ तरी तुला.. आयुष्याच्या शेवटपर्यंत पुरते का?
आधारासाठी धडपडशील तेव्हा..
बघ.. माझी आठवण येते का..?

आजी झाल्यावर नातवांना.. राजा-राणीच्या गोष्टी सांगशील..
कधी राजपुत्र, परी आणि राक्षसाची.. सुध्दा सांगशील..
गोष्ट सांगता सांगता.. तुझे चित्त भूतकाळात हरवते का?
राक्षसाचे वर्णन रंगवताना तरी..
बघ.. माझी आठवण येते का..?

तुझ्यासाठी......




तु मला स्वप्नं दिलीस,
माझ्या जगण्याला ध्यास दिला,
मी असाच उगाचच जगत होतो
तु आयुष्याला श्वास दिला.

माझी पाऊलं अडखळायची
तु मला वाट दिलीस,
आता माझ्यातुन उसळणारी,
प्रत्येक जिवंत लाट दिलीस,

तु दिलंस आभाळ मला,
माझ्यासाठी माझं म्हणुन,
आता मलाही जगायचय,
तुझ्यासाठी,तुझा म्हणुन.......

फसलेली प्रेमकहाणी!!

नाही वाटले कधीही,
कुणा दुस-यावरती झुरावे,
तुझ्या नकाराने का माझे,
जन्मांचे प्रेम सरावे???

नसते काही कळ्यांच्या,
नशिबी भाग्य फ़ुलाचे,
म्हणूनी का वेड्या कळ्यांनी,
जन्म घेण्याचे थांबावे???

खचलो जरी मी आज,
राहेन उभा नव्याने,
उरी जपुन ठेवीन मात्र,
माझे हे अर्धवट गाणे,
जाशिल तू जिथेही,
तव पायी सुख नांदावे,
‌इतकाही स्वार्थी नव्हतो कधी मी,
की तव शुभहीतही न चिंतावे???

जा‌ईन देवाकडे जेव्हा मात्र,
मांडेन माझे गा-हाणे,
विचारेन, इतके का शुल्लक होते,
माझे हे प्रेम दीवाणे???

कहाणी ही एका वेडया मनाची............ ........




कहाणी ही एका वेडया मनाची............

वाळुवर बनवलेली,
दोन घरं मी स्वत:ची,
एक ते लाटेत कोलमडलं,
आणि दुसरं ते वाहुन गेलं,
काय दोष द्यावा त्या लाटेला ?
वाळुवर घर बनवणं,
ही गोष्ट्च मुळ चुकीची,
कहाणी ही एका वेडया मनाची............

श्रावणात बहर आला,
आख्या रानाला पण,
एक कळीही ना,
उमलली माझ्या अंगणाला,
माझ्या अंगणात होते,
हीच चुक का त्या रोपांची,
कहाणी ही एका वेडया मनाची...........

चमकत्या त्या वस्तुला,
मी नेहमीच सोनं मानलं,
समजाऊनही न बदलली,
नितीमत्ता माझी,
हाव होती तेव्हा मला,
त्या चमकत्या सोन्याची,
कहाणी ही एका वेडया मनाची............

आता सगळं संपलय,
उठलाय सगळा बाजार,
जडलाय मनाला,
एकटेपणाचा भयंकर आजार,
डोळ्यात माझ्या डोलतेय,
मजेत आता माळ आसवांची,
कहाणी ही एका वेडया मनाची............

पाहतोय मी वाट एक,
नवी सकाळ उजाडण्याची,
पण आता घाई नाही करणार,
नवा बाजार मांड्ण्याची,
आणि आता वाट पाहणार,
नाही कुणाच्या वाटही साथीची,
कहाणी ही एका वेडया मनाची............

नाव बुडण्याआधी किनारा पाहून घे........

नाव बुडण्याआधी किनारा पाहून घे,
जो नेईल नदीपार असा सहारा शोधुन घे,
माझा मृत्यू इथेच लिहीलाय याच सागरात,
मला शेवटाचा एकदा मिठीत सामावुन घे.....

जेवढं रडायचं आहे आज रडून घे,
ज्या शपथा सोडायच्या त्या सोडून घे,
आठवणींशीवाय काहीच नाही माझ्याकडे,
आणखी काही हवं असेल तर मागुन घे.....

आज तुझी प्रत्येक इच्छा पुर्ण करुन घे,
आज शेवटच मला डोळे भरुन पाहून घे,
उद्या तुझ्यावर कोणा दुस-याचा हक्क असेल,
जे काही विसरायचं असेल ते विसरुन घे.....

नाहीच जुळले तर शब्द जुळूवुन घे,
सगळ्या कविता आज पुन्हां वाचुन घे,
तुझ्या आठवणी जखमांवर मीठ चोळतात,
जाताना तुझी एक एक आठवण चाळून घे.....................

मी देईन कधी हाक तुला प्रिये...........





मी देईन कधी हाक तुला प्रिये,
सांग साद मला तु देशील ना ?

खूप अडखळीची आहे वाट ही,
कधी काट्यांवरी पडेल टाच ही,
धडपडताना ह्या खडतर वाटेवर,
सांग हात मला तु देशील ना ?

तुझ्या प्रितीचा आहे ध्यास मला,
तुझ्या भेटीची आहे आस मला,
कधी एकटेपणाचा होईल भास मला,
सांग साथ मला तु देशील ना ?

कधी रागवेन मी तुझ्यावरती,
कधी भांडेन मी तुझ्या संगती,
कधी येईल दडपण या मनावरती,
सांग कुशीत मला तु घेशील ना ?

मी देईन कधी हाक तुला प्रिये,
सांग साद मला तु देशील ना ?